असं म्हणतात प्रेमापुढे भल्याभल्यांना झुकावं लागतं, आणि ते खरंही आहे. ढग एवढे उंचावरून जातात पण धरणीची साद त्यांना बरसायला भाग पडते, माणूस मग तो एखादा पहिलवान जरी असला तरी तो त्याच्या लहान मुलाने हाताला धरून खाली बसवले तरी चित् झाल्यासारखा खाली पडतो !!! ही ताकद बाहूंची नसते तर प्रेमाची असते . सृष्टीतही अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात..आता क्षितीजाचच पहा ना,
पृथ्वीवरच्या प्रेमाखातर
आभालालाही झुकावं लागतं
क्षितिजाचं रूप घेऊन त्याला
हातावरती टेकावं लागतं....
पृथ्वीवरच्या प्रेमाखातर
आभालालाही झुकावं लागतं
क्षितिजाचं रूप घेऊन त्याला
हातावरती टेकावं लागतं....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा