गुरुवार, १६ जून, २०११


आजची माझी चारोळी.....
      आयुष्याच्या एखाद्या वळणावर कोणी तरी आयुष्यात येतं, त्याचं येणं जगण्याची दिशाच बदलून टाकतं, सगळं जग उत्सव साजरा करीत असल्याचा रुपेरी भास व्हायला लागतो, आपण स्वतःवर जास्त प्रेम करायला लागतो, जगण्याच्या प्रेरणेला कारण सापडलेलं असतं, त्या एका व्यक्तीसाठी जगाशी टक्कर घ्यायची सुद्धा तयारी असते, तिच्या सहवासातला प्रत्येक क्षण मनात गोन्दनासारखा कोरल्या गेलेला असतो पण......अचानक त्या व्यक्तीची आणि आपली नकळत ताटातूट होते आणि मन उदासून जातं,जे कधी मिळालंच नव्हतं तेच हरवल्याची जाणीव मन अंधारून टाकते तेव्हा....आपण व्यथित होऊ नये, ही  पृथ्वी गोल आहे जो जातो तो परतही येतोच आणि जिथे ऋणानुबंध असतो तिथे तर कधी जाणाऱ्याला अडवूच नये का ते पहा.....
                                                                    
                         जाणाऱ्याला कधी अडवू नये
                    आपल्याच मनाला घालावा आवर            
                    जाऊन जाऊन जाईल कोठे ???
                    ऋणानुबंध असल्यावर....


   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा