सोमवार, १३ जून, २०११

माझी आजची चारोळी...

आपण जे काही लिहितो, आपल्याला जे काही सुचतं, ती आपली प्रतिभा आहे असंच आपल्याला वाटत असतं,पण हे सगळं आधीच कुठेतरी अस्तित्वात असतं फक्त आपल्याला त्याचा एका निश्चित वेळी साक्षात्कार घडतो आणि ती कल्पना शब्दाचं रूप लेवून कागदावर अवतरित होते...म्हणूनच 'तो' आपल्याला या आविष्कारासाठी निवडतो आणि आपण त्या लिखाणाचं माध्यम बनतो.......हाच ईश्वर आपल्यासारख्या नगण्य यःकश्चित लोकांना खूप काही देतो आपण मात्र त्यालाच त्यातून थोडासा देवून भूलवायला बघतो...!!! या विसंगतीवर सुचलेली ही चारोळी खास आपणा सर्वांसाठी....
                                ''मोठ्या भेटी मोठे हार वाहून
                                 दानशूरपणाचा आव आणतात,
                                 त्याचंच घेऊन त्यालाच देण्यात
                                 लोक धन्यता मानतात !!!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा