कधी कधी आपण एखाद्या चिंतेने ग्रासले जातो.आपल्या सभोवतीच्या कोणत्याही गोष्टी आपल्या मनाला सुखावू शकत नाहीत, आपल्या मनातील व्यथा मनाचा गाभारा अंधारून टाकते , तेव्हा आपण स्वतःला एका अनामिक कोषात गुरफटून घेऊन आतल्या आत जिरत असतो अशा वेळी धीर न सोडता परमेश्वरावर सगळी चिंता सोडून देउन निश्चिंत व्हावे. त्या सख्याला मनीच्या चिंता सांगितल्याने आपले मन हलके तर होतेच पण पुन्हा नव्या संकटांना तोंड देण्याची उर्जा आपल्या मनाला मिळते म्हणूनच मला वाटतं.......
सगळी दुःखं संपून जातात
विश्वास ठेवावा वरच्यावर
दगडाचाही परीस होतो
'त्याची' एक नजर पडल्यावर.....
पटत नसेल तर आजमावून पहा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा