स्वार्थाने बरबटलेल्या या जगात चांगलेही लोक काही कमी नाहीत. पण त्या चांगुलपणाची त्यांना चांगलीच किंमत मोजावी लागते, या किमतीच्या अदायगीसाठी पराकोटीची हिम्मत लागते. सगळेजण त्या चांगुलपणाचा फायदा उचलायला तर सरसावून पुढे होतात पण जेव्हा काम निघून गेलेले असते तेव्हा मात्र त्यांना या चांगल्या लोकांची साधी आठवण सुद्धा येत नाही !!! किती कमालीचे जग आहे हे ! लोक चांगली कामं करण्याचा मनोभावे संकल्प करतात आणि मग त्याची किंमत मोजायची वेळ आली कि मात्र मग पळ काढतात !!! असो, चांगुलपणात स्वतःचा बळी देणाऱ्या पण आपला भोवतालचा अंधार हटवणा-या दिव्याच्या वातीची हिम्मत पहा नं,
दुसऱ्याला उजेड देण्यासाठी
दिव्याची वात स्वतः जळते
या जगात चांगुलपणाची
एवढी किंमत मिळते !!!