पाऊस....मनातला मन भरून बरसणारा आणि मन भरून आणणारा...पावसाचा आणि जुन्या आठवणींचा संबंध तसा जास्तच जवळचा....ढग दाटून येतात तशा आठवणीही दाटतात...वाऱ्याच्या झुल्केनेही ढग जसा झरतो तसंच मन भरून आलेलं असलं की डोळ्यांनाही धार लागते...का हा पाऊस नेहमीच एवढा आपला एवढा जवळचा वाटतो ??? का कुणास ठाऊक ? त्याचं आपल्याशी एक शब्दातीत नातं असतं....ते नातं म्हणूनच पावसाची वाट आतुरतेनं पाहायला लावतं.....
सखे तुझ्या आठवणींच्या
आज सरींवर सारी आल्या
मरून खोडप्राय भावना
परत एकदा ओल्या झाल्या.....
सखे तुझ्या आठवणींच्या
आज सरींवर सारी आल्या
मरून खोडप्राय भावना
परत एकदा ओल्या झाल्या.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा