गुरुवार, २१ जुलै, २०११

मन भावना...

     कोणतेही काम करतांना, कोणताही निर्णय घेतांना अगोदर आपण डोक्याने विचार करतो. नेहमीच आपण सगळ्या शक्यता तर्काच्या कसोटीवर जोखून पाहतो. त्या गोष्टीच्या नफा नुकसानीचा विचार करतो, त्यानंतर त्या बाबतीतला निर्णय घेतो पण तो घेतल्यावरही आपला मेंदू स्वस्थ बसत नाही परत शंका कुशंका आपल्या डोक्यात येतात आणि आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडवतात. म्हणजे काय होते, विचार डोके करते आणि शिक्षा बिचाऱ्या मनाला भोगावी लागते, त्यात त्याचा दोष नसतांना !!! म्हणून मला असे वाटते कि, आपण नको एवढे महत्व डोक्यालाच न देता थोडा मनालाही भाव द्यावा कारण आपलं मन वेळोवेळी आपल्याला भल्या बु-याची जाणीव करून देतच असते ना. पण आपण मनाचे सल्ले नेहमीच भावनिकता म्हणून बाजूला सारून तर्काधिष्ठित निर्णय घेण्यातच धन्यता मानत असतो...

डोक्यानेच विचार करू नये
कधी मनालाही वाव द्यावा,
गणिती हिशेब बाजूला ठेवून
भावनांनाही भाव द्यावा....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा