आपण नेहमीच काही गोष्टी मनात ठेवतो, कधी तरी त्या बोलून दाखवू म्हणून मनात तशाच त्या आपण साठवतो पण निसर्गाचाच नियम सांगतो कि ज्या गोष्टी एकाच जागी तशाच राहतात कालांतराने त्या कुजतात आणि त्यांचा वास येतो, म्हणून माणसाने मनात काहीच ठेवू नये जे मनात येईल ते शब्दात व्यक्त करून टाकावे म्हणजे मनात त्याचे विष तयार होणार नाही. भलेही पुढच्याला आपला कितीही राग येवो नाहीतर कितीही आपलेपणा वाटो. कधी कधी तर आपल्या चूप राहण्यातून बरचसं नुकसानच होत असतं, म्हणून...
राग येवो लोभ वाटो
आपण नेहमी व्यक्त व्हावं
साचल्या नंतर सडलेपण येतं
आपण झ-यागत वाहून जावं.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा