शरीरावर झालेला वार कालांतराने विरून जातो, पण मनावर झालेली जखम मात्र कधीच मिळून येत नाही. मिटणं तर केवळ अशक्य. म्हणून कोणाच्या मनाला लागेल असं काही बोलू नये, आपल्या अपेक्षा दुसऱ्याच्या मनाला छेदुन तर जात नाहीत ना याचा आधी विचार करूनच मग त्या बोलून दाखवाव्या नाही तर मन दुखावून जिंकलेले पृथ्वीचे राज्यसुद्धा मातीमोल !!! मनावर झालेली जखम शरीरावरच्या मारापेक्षा जास्त खोलवर कायम बोचणारा सल तयार करते तिचा त्रास इतका भयंकर असतो की शब्दात तो व्यक्त करताच येऊ शकत नाही.....
मनावरच्या माराचे
वरून वण उमटत नाहीत
हुंदका दाटून आला की
शब्द सुद्धा फुटत नाहीत....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा