रविवार, १७ जुलै, २०११

आपलं दुःख आणि 'तो'

     दुःख नेहमीच नकोसं वाटणारं...पण तितकंच अपरिहार्य. आपल्यापैकी प्रत्येकालाच आपापलं दुःख इतरांपेक्षा थोडं जास्तच वाटत असतं. मग हे दुःख आपल्याला परमेश्वरानच दिलं म्हणून आपली तक्रार सुरु होते. वेळोवेळी त्यासाठी ईश्वराला हजारदा जाब विचारला जातो. दुःखाला माप असतं तर लोकांनी नक्कीच त्याची मोजदाद करून पाहिली असती पण प्रत्येक गोष्टीसाठी रडण्याचा मानवी स्वभावाच आहे. पण मला वाटतं आपल्याला मिळालेलं दुःख हे सोसण्याइतकंच असतं. आपल्या सोसण्याची मर्यादा संपली की तो त्यातून आपली मुक्तता करतो...


सोसेल एव्हढेच दुःख
'तो' आपल्याला देतो
तेवढं सोसून झालं की,
जवळ बोलावून घेतो...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा