डोक्यानेच विचार करू नये
कधी मनालाही वाव द्यावा,
गणिती हिशेब बाजूला ठेवून
भावनांनाही भाव द्यावा....
मन एक अगम्य,अथांग,अकल्प्य आणि अतर्क्य असा विषय...या मनाचा एक आवाज नेहमीच मला ऐकू आलेला...त्याला कुणी श्रीकृष्णाच्या वेणूचे नाव दिलं तर कोणी मीरेची प्रेमधून म्हटलं,कुणाला विश्वाचे आर्त वाटला हा आवाज तर कोणाला सत्यम शिवं सुंदरम चा आभास जाणवला याच आवाजात... आणि तोच हा आपल्याच अंतरातून ध्वनित होणारा....'अंतर्नाद'.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा